ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरू झाला आहे. आजकाल लोकांची जीवनशैली बदलली आहे. काही लोकांना या ऋतूत आंबे खायला आवडतात.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पावसाळ्यात आंबा खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो, जाणून घ्या.
आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी६, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, फोलेट, फायबर, पोटॅशियम, अँटी-ऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम असते.
पावसाळ्यात आंबे खाऊ नये कारण या ऋतूत आंब्याच्या सालींना बॅक्टेरिया चिकटतात. आंबे कितीही धुतले तरी हे बॅक्टेरिया जात नाहीत.
हे बॅक्टेरिया आरोग्यासाठी खूप हानिकारक मानले जातात. यामुळे तुम्ही पावसाळ्यात आजारी पडू शकता. निरोगी राहण्यासाठी, पावसाळ्यात आंबे खाणे टाळावे.
आंबे खाण्याआधी ते २ तास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर, ते स्वच्छ धुवून खा.
आंबा खाताना वेळेची काळजी घ्या. संध्याकाळी ५ नंतर कधीही आंबे खाऊ नयेत. यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.