Siddhi Hande
राहुरी पार्थडीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
शिवाजीराव कर्डिले यांचे अहिल्यानगरच्या राजकारणात खूप मोठे नाव आहे. त्यांचा राजकीय प्रवास खूप खडतर होता.
शिवाजीराव कर्डिले यांच्या कुटुंबाचा दूधाचा व्यवसाय होता. ते स्वतःदेखील दूध विकायचे.
शिवाजीराव कर्डिले हे दूध विकण्यासाठी नगरमध्ये यायचे. त्यांना फार पूर्वीपासूनच राजकारणात रस होता.
शिवाजी कार्डिले यांनी सरपंच पदापासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली.
शिवाजी कार्डिले यांनी सुरुवातीला अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते निवडूनदेखील आले.
आता पुन्हा ते २०२४ मध्ये आमदार झाले होते.
शिवाजी कर्डिले यांनी मंत्रिपदापर्यंत आपली मजल मारली होती. ते नेहमी जनतेच्या सेवेसाठी तयार असायचे.