Shruti Vilas Kadam
संभाजीराजे यांचा जन्म १६२३ मध्ये झाला. शहाजीराजे आणि जिजाऊंच्या ६ पुत्रांपैकी ते तिसरे पुत्र होते.
यासह संभाजीराजे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते. त्यांचे बालपण शहाजी राजांच्या बंगळूर (कर्नाटक) येथील वास्तव्यात गेले.
संभाजीराजे लहानपणापासूनच धाडसी होते. त्यांना वडिलांकडून युद्धनीती, मुत्सद्देगिरी, गनिमी कावा आणि संस्कृतचे उत्तम शिक्षण मिळाले होते.
कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत शहाजीराजे यांनी संभाजीराजे यांना पाठवले होते. येथे अफजल खानाने दगाफटका करून संभाजी राजांची हत्या केली.
१६५५ मध्ये कर्नाटकातील कनकगिरीच्या झालेल्या या लढाईत संभाजी राजांना वीरमरण आले.
संभाजीराजे हे स्वराज्य स्थापनेच्या आधीच पराक्रम गाजवणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची समाधी कनकगिरी (कर्नाटक) येथे आहे.
आपल्या थोरल्या भावाच्या (संभाजीराजे) हत्येचा बदला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी कनकगिरीवर मोहीम आखली होती आणि त्यानंतर अफजल खानाचा वध केला, असेही मानले जाते.