Siddhi Hande
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती खूप मोठी आहे. प्रत्येक ठिकाणी काही न काही स्पेशल पदार्थ बनवले जातात.
कोकणातील शिरवाळे खूप प्रसिद्ध आहेत. शिरवाळे म्हणजेच नारळाच्या दुधातील शेवया.
तांदळाचे पीठ, पाणी, तूप, मीठ, नारळाचे घट्ट दूध, गूळ, वेलची पूड, मीठ
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवा. त्यात तूप आणि मीठ टाका.
पाणी उकळल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून उकड काढा. याच्याच तुम्हाला शेवया बनवायच्या आहेत.
यानंतर तुम्हाला शेवयाच्या साच्यात तांदळाचे पीठ टाकून त्याच्या शेवया पाडून घ्या.
यानंतर एका टोपात पाणी गरम करायचे आहे. त्यावर चाळणी ठेवून त्यात शेवया ठेवा. शेवया ५-७ मिनिटे वाफवून घ्या.
यानंतर तुम्हाला एका भांड्यात नारळाचे दूध घ्यायचे आहे. त्यात गूळ, वेलची पूड आणि मीठ टाकून गरम करायचे आहे. दूध जास्त उकळून नका.
यानंतर गरम शेवयांवर नारळाचा रस ओतून गरमागरम खाऊ शकता.