Shreya Maskar
कडाक्याच्या उन्हात फिरून आल्यावर थंडगार एक ग्लास शिकंजी प्या. तुम्ही रिफ्रेश व्हाल. तुमचा सर्व ताण निघून जाईल.
शिकंजी बनवण्यासाठी थंड पाणी किंवा सोडा, लिंबांचा रस, गूळ , काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, पुदिन्याची पाने, बर्फाचे तुकडे इत्यादी साहित्य लागते.
शिकंजी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यात थंड पाणी ओता आणि त्यात गूळ घालून चांगले ढवळा. गूळ नीट विरघळेल याची काळजी घ्या.
आता त्यात लिंबाचा रस, काळे मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घाला. तसेच बर्फाचे तुकडे आणि पुदिन्याची काही पाने मिक्स करा.
तयार केलेली शिकंजी एका ग्लासात ओता. त्यावर थोडा चाट मसाला भुरभुरवा आणि प्या.
शिकंजीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीराला उष्माघातापासून वाचवतात. आपले शरीर कायम हायड्रेट ठेवतात.
शिकंजीमधील काळे मीठ आणि जिरे अपचन टाळण्यास मदत करते. तुम्ही जेवून झाल्यावर एक ग्लास शिकंजी नक्की प्या.
तुम्ही साखरे ऐवजी गूळ वापरा. गूळ आणि लिंबू यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते, ज्यामुळे शरीर ताजेतवाने राहते.