Alisha Khedekar
श्रावणात पचनशक्ती मंदावू शकते. जास्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ काही लोकांमध्ये अपचन आणि कफ वाढवू शकतात.
भजी, वडे, समोसे यांसारखे पदार्थ पचायला जड असून अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास वाढवू शकतात.
कच्च्या सॅलडमध्ये जंतू असण्याचा धोका असतो. स्वच्छ धुऊन किंवा शिजवून खाणे अधिक सुरक्षित.
पावसाळ्यात मांस आणि मासे लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
अतिथंड पेये घसा दुखणे, सर्दी आणि पचनाच्या तक्रारी वाढवू शकतात.
जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढणे, सुस्ती आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण बिघडू शकते.
ओलसर हवामानात शिळ्या अन्नात जीवाणू वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका असतो.