साडेसाती साडेसात वर्ष तर शनि महादशा किती दिवस असते?

Bharat Jadhav

शनिची महादशा

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिची महादशा 19 वर्षे राहत असते. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी शनिच्या महादशेचा अनुभव घेते.

महादशा लागली तर काय करावं?

जर एखाद्या व्यक्तीने या काळात चांगली कर्मे केली नाहीत, तर त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. शनिच्या महादशेचे परिणाम कमी करण्यासाठी, या काळात पुण्यकर्मे करावीत आणि कोणाशीही कपट किंवा द्वेष टाळावा. गरजू लोकांना दान करणे आणि हनुमान चालिसेचे पठण करावे.

शनि साडेसाती म्हणजे काय?

जेव्हा शनि ग्रह एखाद्या राशीतून भ्रमण करतो, तेव्हा त्या राशीत तसेच त्यापूर्वीच्या आणि नंतरच्या राशींमध्येही शनिची साडेसाती सुरू होते. शनिची साडेसाती 7.5 वर्षे राहत असते. साडेसातीचे तीन टप्पे असतात, प्रत्येक टप्पा अडीच दिवसांचा असतो.

साडेसाती किती वेळा येते?

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात साडेसाती दोनदा येते. या काळात व्यक्तीला करिअरपासून ते प्रेम जीवनापर्यंत सर्व गोष्टींमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असतो.

उपाय काय करावे

शनीच्या साडेसातीच्या प्रभावापासून रक्षण करण्यासाठी शनिवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर, काळ्या तिळाच्या बिया मिसळलेल्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक करावे. तेल, मीठ, लोखंड, धान्य आणि भांडी दान करणे देखील फायदेशीर ठरू शकते.

शनि ढैय्या म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनि चंद्र राशीपासून चौथ्या किंवा आठव्या घरात प्रवेश करतो, तेव्हा व्यक्तीला शनि ढैय्याचा अनुभव येऊ लागतो. शनि ढैय्याचा कालावधी अडीच वर्षाचा असतो. यामुळे आर्थिक आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात. त्याचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी, व्यक्तीने चांगली कर्मे करावीत. शनिवारी उपवास करावे. आणि भगवान हनुमानाची पूजा करावी.

हेही वाचा

येथे क्लिक करा

पती-पत्नीने जॉइंट होम लोन घेतलं अन् एकाचा मृत्यू झाला तर? EMI कोण भरणार?