Shruti Vilas Kadam
शॅम्पू थेट केसांवर लावण्याऐवजी आधी थोड्या पाण्यात मिसळून घ्या. त्यानंतर तो टाळूवर हलक्या हाताने लावा. यामुळे शॅम्पूचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते.
शॅम्पू करताना नखांनी टाळू जोरात घासणे टाळा. यामुळे टाळूला इजा किंवा जळजळ होऊ शकते. बोटांच्या टोकांनी हलक्या हाताने मसाज करणे योग्य ठरते.
केस धुताना खूप गरम पाणी वापरल्यास टाळूतील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. त्यामुळे केस कोरडे आणि रूक्ष होण्याची शक्यता असते. शक्यतो कोमट किंवा साध्या पाण्याचा वापर करा.
शॅम्पूचा मुख्य उद्देश टाळू आणि मुळांवरील तेल व घाण स्वच्छ करणे हा आहे. त्यामुळे केसांच्या संपूर्ण लांबीवर जास्त शॅम्पू लावण्याची गरज नसते.
केस धुतल्यानंतर टाळूवर शॅम्पू शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्या. शॅम्पू नीट निघाला नाही तर टाळूला खाज, कोरडेपणा किंवा इतर त्रास होऊ शकतो.
दररोज किंवा गरजेपेक्षा जास्त वेळा केस धुतल्याने केसांमधील नैसर्गिक तेल कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्या केसांचा प्रकार आणि टाळूची स्थिती लक्षात घेऊन शॅम्पू करण्याची वारंवारता ठरवा.Shampoo Tips
प्रत्येकाच्या केसांचा आणि टाळूचा प्रकार वेगळा असतो. त्यामुळे तेलकट, कोरडे, कोंडा असलेले किंवा संवेदनशील टाळू यानुसार योग्य शॅम्पू निवडणे महत्त्वाचे आहे. टाळूची समस्या सतत जाणवत असल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या.