ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदू धर्मात दिवा लावल्या शिवाय कोणतीही पूजा संपन्न होत नाही.
दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवाची पूजा करून दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी राहाते.
घरात दिवा लावल्यामुळे मकारात्मक उर्जा दूर राहाण्यास मदत होते आणि वातावरण प्रसन्न होते.
चला जाणून घेऊया दिवा लावायचा नियम काय आणि कोणता मंत्र बलायचे.
पूजा करताना देवी देवतांच्या मूर्ती समोर दिवा लावा. रोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावावा. यामुळे घरात लक्ष्मीची कृपा राहते.
दीपप्रज्वलन करताना 'शुभं करोति कल्याणम्, आरोग्य धन संपदम्, शत्रु बुद्धी विनाशाय, दीप ज्योति नमोस्तुते.' या मंत्राचा जप करावा.
तेलाच्या दिव्यात लाल वात आणि तुपाच्या दिव्यात पांढरी कापसाची वात ठेवावी.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही