Shruti Vilas Kadam
सावनी रविंद्रने वारीला पवित्रतेचं प्रतीक म्हटलं आहे. विठुरायाच्या भेटीसाठी प्रत्येक वारकरी जसा तल्लीन असतो, तसाच भाव तिनेही व्यक्त केला.
आषाढी वारीत पहिल्यांदाच वारकरी म्हणून सहभागी होण्याचा योग यंदा जुळून आला, हे तिला अतिशय विशेष वाटलं.
सावनीने स्वतः गाडी चालवत फलटण येथे जाऊन वारीत सहभाग घेतला आणि तिचा अनुभव "सावनी रविंद्र" या यूट्यूब चॅनेलवर व्लॉगद्वारे शेअर केला.
नाकात नथ, केसात गजरा, साडी अशा पारंपरिक मराठमोळ्या वेशात सावनी वारीत सहभागी झाली, जो तिच्या चाहत्यांसाठीही आकर्षण ठरला.
सावनी म्हणाली की, “वारकरी बनणं ही केवळ इच्छा नव्हे, विठुरायाचं बोलावणं आलं कीच सेवा घडते.” हा अनुभव तिच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.
वारीदरम्यान संत तुकारामांच्या ‘खेळ मांडियेला’ या अभंगाचं शूटिंग सावनीने केलं. वारकऱ्यांनी तिला आपलंसं केल्याने हे शूटिंग अतिशय सहज पार पडलं.
सावनीने नमूद केलं की वारीत कोणताही धर्म, जात, भाषा याचा अडसर नसतो, आणि प्रत्येकाच्या मुखावर हरिनाम असतो – हीच खरी वारीची सुंदरता आहे.