Shreya Maskar
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात साटवली किल्ला आहे. साटवलीचा किल्ला हा गढी प्रकारातील आहे. सुट्टीत येथे आवर्जून भेट द्या.
साटवली किल्ला मुचकुंदी नदीच्या किनाऱ्यावर आहे. येथे मुचकुंदी नदीचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. पावसाळ्यात, हिवाळ्यात येथे भेट द्या.
साटवली किल्लाचा उपयोग मुचकुंदी नदीमधून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे. त्यामुळे साटवली किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे.
साटवली हे ऐतिहासिक काळातील एक दुय्यम व्यापारी बंदर होते. तुम्ही किल्ल्यावर छान फोटो देखील काढू शकता.
साटवली किल्ला हा ट्रेकिंगसाठी सोपा किल्ला मानला जातो. तुम्हाला पहिल्यांदाच ट्रेकिंग करायची असेल तर हा किल्ला बेस्ट ऑप्शन आहे.
लांजा आणि राजापूर येथून साटवलीसाठी एसटी बस उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही सहज किल्ल्यापर्यंत पोहचू शकता.
साटवली किल्ल्यावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. त्यामुळे सुट्टीत येथे नक्की भेट द्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.