Shreya Maskar
सज्जनगड किल्ला हा साताऱ्यापासून साधारण १६ किमी अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या रांगांमधील ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. सज्जनगड किल्ला, म्हणजे 'चांगल्या लोकांचा किल्ला' असे बोले जाते.
संत समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरू होते. 3,350 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला संत समर्थ रामदासांचे अंतिम विश्रांतीस्थान आहे.
सज्जनगड किल्ला मूळतः १३ व्या आणि १५ व्या शतकांच्या दरम्यान बहामनी सल्तनतीने बांधला होता. नंतर तो आदिलशाही राजवटीच्या नियंत्रणाखाली आला.
सज्जनगड किल्ला मूळचा 'परळीचा किल्ला' म्हणून ओळखला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 'सज्जनगड' (सज्जनांचा किल्ला) असे नामकरण केले.
सज्जनगड किल्ला हा ९१४ मीटर उंचीवर असलेला टेकडीवरचा किल्ला आहे. सर्व बाजूंनी नैसर्गिक खडक, पायऱ्यांचा मार्ग, दोन मुख्य तटबंदी असलेले प्रवेशद्वार आणि ऐतिहासिक मंदिरे आणि संतांच्या समाधी पाहायला मिळते.
सज्जनगड किल्ल्यावर जाण्यासाठी सुमारे ३०० पायऱ्यांचा मार्ग आहे, जो चढण्यास सोपा ते मध्यम स्वरूपाचा आहे. येथून दरीचे विहंगम दृश्य दिसते.
तुम्ही ट्रेनने सातारा रेल्वे स्टेशनला उतरा. तेथून पुढे सज्जनगड किल्ल्यापर्यंत एसटी बस किंवा रिक्षाने प्रवास करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.