Shreya Maskar
उपवासाला संध्याकाळी नाश्त्याला वरीच्या तांदळाचा उपमा बनवा.
उपवासाला वरीचा तांदूळ खाल्ला जातो.
वरीच्या तांदळाचा उपमा बनवण्यासाठी वरीचा तांदूळ, काजू, जिरं, हिरवी मिरची, बटाटा, पाणी, मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट इत्यादी साहित्य लागते.
वरीच्या तांदळाचा उपमा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून काजूचे तुकडे, जिरे, हिरवी मिरची, बटाटा चांगला परतून घ्या.
त्यानंतर यात वरीचा तांदूळ घालून छान भाजून घ्या.
या मिश्रणात पाणी, चवीनुसार मीठ, साखर आणि शेंगदाण्याचा कूट घालून मिश्रण एकजीव करा.
उपम्याला उकळी आल्यानंतर ५-१० मिनिटांसाठी त्यावर झाकण ठेवा.
अशाप्रकारे चविष्ट वरीच्या तांदळाचा उपमा तयार झाला आहे.