India Tourism : भव्य किल्ला अन् मजबूत भिंती; भारतातील 'हे' ठिकाण ऐतिहासिक पराक्रमाचे प्रतीक

Shreya Maskar

बिहार

बिहारमधील रोहतास गड किल्ला सोन नदीच्या काठावर, कैमूरच्या डोंगरांमध्ये वसलेला आहे.

fort | google

रोहतास गड

रोहतास गड भारतातील सर्वात मोठ्या आणि प्राचीन किल्ल्यांपैकी एक असून तो ऐतिहासिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. जिथून सोन नदीचे विहंगम दृश्य दिसते.

fort | google

ऐतिहासिक वास्तू

रोहतास गड हा किल्ला त्याच्या भव्य तटबंदी, सुंदर दरवाजे, राजवाडे, मंदिरे आणि इतर ऐतिहासिक वास्तूंसाठी प्रसिद्ध आहे.

fort | google

कोणी बांधला?

रोहतासगड किल्ला राजा हरिश्चंद्राचा पुत्र रोहिताश्व याने बांधला असे मानले जाते, आणि नंतर शेरशाह सुरीने तो अधिक मजबूत केले. आजही इतिहासप्रेमींसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.

fort | google

नावाचा इतिहास

रोहतासगड किल्ल्याला राजा हरिश्चंद्र यांचा पुत्र रोहिताश्व यांच्या नावावरून नाव मिळाले आहे. कारण पौराणिक कथेनुसार, रोहिताश्व यांनी या किल्ल्याची स्थापना केली होती.

fort | google

मंदिर

रोहतासगड किल्ल्यामध्ये एक प्राचीन गणेश मंदिर आहे. जे मुघल सम्राट अकबरचा मनसबदार राजा मान सिंह याने सुमारे १५९० मध्ये बांधले होते. वास्तुकला आणि ऐतिहासिक महत्त्व आजही कायम आहे.

fort | google

तटबंदी

रोहतासगड किल्ला मोठ्या तटबंदी आणि डोंगरावरील त्याच्या उंच स्थानामुळे शत्रूंना रोखण्यासाठी एक अतिशय मजबूत आणि मोक्याचा किल्ला होता.

fort | google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

fort | google

NEXT : डोंगर, धबधबा, किल्ला; सर्वकाही एकाच ठिकाणी, पुण्यातील 'हे' ठिकाण पर्यटकांचे आकर्षण

Pune Tourism | saam tv
येथे क्लिक करा...