ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल जवळजवळ प्रत्येक घरात आरओ फिल्टर सिस्टम आहे. अनेक लोक हे पाणी पितात. असे म्हटले जाते की, आरओ सिस्टीमद्वारे फिल्टर केलेले पाणी पूर्णपणे सुरक्षित असते.
डॉक्टरांच्या मते, आरओ द्वारे फिल्टर केलेल्या पाण्यातून पोषक घटक निघून जातात. यानंतर हे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. तसेच जर तुम्ही बाटलीबंद आरओ पाणी बराच काळ साठवून ठेवून पितात. तर हे पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे.
आरओ पाणी प्यायल्याने शरीराला कोणताही फायदे किंवा तोटे होत नाही. कारण यात कोणतेच पोषक घटक नसतात.
नळाच्या पाण्यात मिनरल्स असतात. जे शरीराला फायदेशीर आहे. पण आरओच्या पाण्यात हे मिनरल्स नष्ट होतात. म्हणूनच याला डेड वॉटर असेही म्हणतात.
तज्ज्ञांच्या मते, नळाचे पाणी हे आरओ पाण्यापेक्षा चांगले आहे. पण नळातले पाणी स्वच्छ असले पाहिजे.
अस्वच्छ आरओ पाणी प्यायल्याने पोटदुखी, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता, आणि डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
वेळेवर फिल्टर स्वच्छ करत रहा आणि बदलत रहा. यामुळे तुम्हाला स्वच्छ पाणी मिळेल.