ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच अनेक समस्या या निर्माण होण्यास सुरुवात होते.
त्यातील एक सर्वसाधारण समस्याही कपाटात ठेवलेल्या कपड्यांना वास येतो.
जर पावसाळ्यात कपाटातील कपड्यांना वास येत असल्यास तुम्ही कपाटात एका कपड्यात कडुलिंबाचा पाला भरुन ठेवा.
मिठानेही कपाटातील कपड्यांना आलेला वास निघण्यास मदत होते.
एका कापडात काही कापराचे तुकडे भरुन ते कपाटात ठेवून द्या. या उपायाने कपड्यांना वास येत नाही.
बाजारात सहज मिळणाऱ्या डांबर गोळ्याच्या मदतीने कपाटातील कपड्यांना वास येत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.