ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक घरात भाताशिवाय जेवणाचे ताट पूर्ण होत नाही. भात हा कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम स्त्रोत आहे.
भात खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. याशिवाय त्यात असलेल्या पोषक तत्त्वामुळे भात आरोग्यासाठी चांगला मानला जातो.
काहीलोकांच्या म्हणण्याप्रमाणे भात खाल्ल्यावर त्यांना झोप येते. पण असे सगळ्यांनाच होते असे नाही.
भात खाल्ल्यावर झोप येणे हे व्यक्तीच्या शरीरावर आणि आहारात भाताचे प्रमाण किती आहे यावर अवलंबून असते.
विशेषत: भातामध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि त्यामुळे सुस्ती किंवा झोप येते.
रक्तातील साखर वाढल्याने मेंदूतील सेरोटोनिन आणि मेलोटोनिनची पातळी वाढते. जे झोपेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स आहेत.
दिवसा आपण जास्त अॅक्टिव्ह असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. दिवसाच्या जेवणात, विशेषत: दुपारच्या जेवणात खाल्ल्यास झोप येण्याची शक्यता जास्त असते.
काहीलोकांना भात खाल्ल्यावर लगेच झोप येते, तर काहींना अजिबात झोप येत नाही.
तुम्ही भातासोबत उतर जड आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ले, तर तुम्हाला जास्त झोप येऊ शकते.