Shruti Vilas Kadam
लग्न, करिअर किंवा एकत्र भविष्याबाबत बोलणे तो सतत टाळत असेल, तर तो नात्याबाबत गंभीर नसण्याची शक्यता असते.
फक्त स्वतःच्या सोयीप्रमाणे फोन किंवा मेसेज करणे आणि बाकी वेळ दुर्लक्ष करणे, हे नात्यातील प्रामाणिकपणाचा अभावामुळे असू शकते.
खूप काळ नात्यात असूनही तो तुम्हाला त्याच्या जवळच्या लोकांशी भेटवत नसेल, तर त्यामागे काहीतरी कारण असू शकते.
प्रेम, विश्वास किंवा नात्याविषयी स्पष्ट बोलण्याऐवजी तो विषय बदलत असेल, तर त्याच्या मनात संभ्रम असू शकतो.
वारंवार आश्वासने देऊनही ती पूर्ण करत नसेल, तर त्याच्या शब्दांपेक्षा कृतीकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे ठरते.
भेटी, संवाद किंवा नाते टिकवण्यासाठी प्रयत्न नेहमी तुम्हालाच करावे लागत असतील, तर हे एकतर्फी नाते असल्याचे संकेत असू शकतात.
तुमच्या आनंद-दुःखाची किंवा अडचणींची त्याला फारशी काळजी वाटत नसेल, तर तो नात्यात भावनिक गुंतलेला नसण्याची शक्यता असते.