ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय मानला जातो.
पुढील आयुष्य सुखकर आणि आनंदी घालवण्यासाठी योग्य जोडीदाराची निवड केली पाहिजे.
लग्नासाठी जोडीदार निवडताना आपल्या त्यांच्याकडून अनेक आपेक्षा असतात. त्यामुळे लग्न ठरवण्यापुर्वी काही गोष्टी विचाल्यास तुमचे लग्नानंतर मतभेद होणार नाहीत.
तुमच्या जोडीदाराच्या आवडीनिवडी जाणून घेणे आणि त्यांना स्वतःबद्दल सांगणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या आयुष्यात करिअरला खूप महत्त्व असतं त्यामुळे लग्नापूर्वी एकमेकांच्या करिअर प्लॅन्सबद्दल चर्चा करा.
बऱ्याच जोडीदारांना लवकर मुलं व्हावी अशी इच्छा असते मात्र काहींना वैवाहिक आयुष्यातील काही वर्षे एन्जॉय करायचं असतात त्यामुळे या मुद्द्यावर बोलून एकमेकांची मतं जाणून घ्या.
आजच्या बदलत्या काळात जोडीदाराच्या आवडी-निवडीबरोबरच एकमेकांच्या आर्थिक परिस्थितीची जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.