Sakshi Sunil Jadhav
पावसाळा सुरु व्हायला आता काहीच दिवस शिल्लक राहीलेत. या दिवसांमध्ये तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे.
पावसाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यासोबत डोळ्यांचे संसर्गही वाढायला सुरुवात होते. अशा दिवसांमध्ये तुम्ही डोळ्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. कशी ते पुढील माहितीतून समजून घ्या.
पावसाळ्यामध्ये वातावरणात जंतूंचं प्रमाण वाढतं, त्यामुळे डोळ्यांना संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
पावसाळ्यात बऱ्याच जणांना डोळे लाल होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यामुळे अस्वस्था सुद्धा वाढते.
पावसाळ्यात सतत डोळ्यांतून सारखं पाणी येतं. ही संसर्गाची सुरुवातीची लक्षणं असतात.
पावसाळ्यात तुम्हाला डोळ्यांमध्ये खाज, जळजळ किंवा वेदना होत असतील तर ही सुद्धा संसर्गाची लक्षणं आहेत.
पावसाळ्यात काही व्यक्तींना डोळ्यांच्या पापण्यांवर हलकी सूज दिसून येते. त्यामुळे घाणेरडे हात डोळ्यांना लावू नका.
स्वच्छ आणि थंड पाण्याने डोळे धूत राहा. सतत त्यांना हात लावू नका. याने संसर्गाचा धोका कमी होईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.