Shreya Maskar
कोकणात रत्नागिरी किल्ला वसलेला आहे. रत्नागिरी किल्ला ज्याला 'रत्नदुर्ग' किंवा 'भगवती किल्ला' म्हणूनही ओळखले जाते, हा महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरात अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला आहे.
रत्नागिरी किल्ला शहराच्या मुख्य केंद्रापासून सुमारे ४-५ किलोमीटर अंतरावर स्थित असून, त्याच्या आवारात अत्यंत पूजनीय असे 'भगवती देवी मंदिर' आहे. येथे तुम्हाला शांत वातावरण अनुभवता येते.
रत्नागिरी किल्ला कोकण किनारपट्टीवरील १६ व्या शतकातील एक प्रमुख जलदुर्ग आहे. तीनही बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला असून किल्ल्यावर एक प्रसिद्ध दीपगृह आहे.
रत्नागिरी किल्लाचे मूळ बांधकाम १२ व्या शतकात शिलाहार वंशाचा राजा भोज याने केले होते. १६७० च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि मराठा साम्राज्याच्या गरजेनुसार त्याची तटबंदी बळकट करून तो अधिक मजबूत केला.
मूळतः कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी आणि या प्रदेशातील सागरी व्यापाराला सुरक्षा पुरवण्यासाठी उभारण्यात आला होता. समुद्री लुटारूंवर कडक पाळत ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जात असे.
अरबी समुद्रात आतपर्यंत घुसलेल्या घोड्याच्या नालेसारख्या आकाराच्या भूशिरावर वसलेला हा किल्ला एक अत्यंत महत्त्वाचा नौदल तळ म्हणून कार्यरत होता.
रत्नागिरी रेल्वे स्टेशनला उतरून पुढे रिक्षाने किंवा एसटीने तुम्ही किल्ल्याच्याजवळ पोहचू शकता. १५-२० मिनिटांचा हा रस्ता आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.