Ratnadurg Fort History: रत्नागिरीत असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्याला 'या' नावानेही ओळखले जाते, प्रत्येकाने पाहिलाच हवा

Dhanshri Shintre

रत्नदुर्ग किल्ला

रत्नागिरीजवळील रत्नदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सागरी किल्ला असून ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध आहे.

भगवती किल्ला

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या रत्नदुर्ग किल्ल्याला भगवती किल्ला म्हणूनही ओळखले जाते, कारण येथे किल्ल्यावर भगवती देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.

निर्मिती

इतिहासकारांच्या मते, रत्नदुर्ग किल्ला सुमारे १२०५ मध्ये शिलाहार राजाओंपैकी राजा भोज यांनी बांधल्याचे सांगितले जाते.

मराठा साम्राज्य

१६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यातून जिंकून आपल्या स्वराज्यात समाविष्ट केला आणि तटबंदी अधिक भक्कम केली.

भौगोलिक स्थान

रत्नदुर्ग किल्ला अरबी समुद्राने तीनही बाजूंनी वेढलेला असून, त्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून, नैसर्गिक संरक्षणासाठी आदर्श ठिकाण मानले जाते.

संरचना

रत्नदुर्ग किल्ला मुख्यतः पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह या तीन भागांमध्ये विभागलेला असून, एकूण २९ बुरुजांनी संरक्षित आहे.

भगवती देवी मंदिर

रत्नदुर्ग किल्ल्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे भगवती देवीचे मंदिर, ज्या कोल्हापूरच्या अंबाबाईची बहीण मानली जाते.

दीपगृह

रत्नदुर्ग किल्ल्याच्या एका बाजूला दीपगृह असून, तिथून रत्नागिरी शहरासह अरबी समुद्राचे सुंदर आणि विहंगम दृश्य पाहायला मिळते.

टेहळणी बुरूज

रत्नदुर्ग किल्ल्यावर अनेक टेहळणी बुरुज आहेत, त्यापैकी 'रेडे बुरूज' समुद्राचे सुंदर आणि मनोरम दृश्य पाहण्यासाठी प्रसिद्ध आहे.

NEXT: रायगडातील 'या' किल्ल्यावर आहे 'चर्च'; इतिहास माहितीये का?

येथे क्लिक करा