Manasvi Choudhary
पावसाला सुरूवात झाली की आपण नवनवीन वस्तूंची खरेदी करतो. ऐन पावसाळ्यात बाहेर पडणे अवघड होते यासाठी तुम्ही उपयोगी वस्तूंची आत्ताच खरेदी करणे महत्वाचे आहे.
पावसाळा म्हटलं की सर्वात पहिली आठवते ती म्हणजे छत्री. पावसाळ्यात छत्री खरेदी करताना मजबूत आणि 'विंड-प्रूफ' छत्री आणि वॉटरप्रूफ रेनकोट खरेदी करा.
पावसाळ्यात बॅग घेणार असाल तर वॉटरप्रूफ बॅगेची निवड करा यामुळे पावसात बॅग भिजली तरी त्यातील पैसे, डॉक्युमेट्स ओले होणार नाही.
पावसाळ्यात वॉटरप्रूफ पादत्राणे वापरा. अनेकजण पावसाळ्यात चामड्याच्या , मोजडी,चप्पला घालतात मात्र या चपलावर बुरशी येते यामुळे अशा चपला घालू नका.
पावसाळ्यात त्वचेची काळजी घेणे महत्वाचे आहे. त्वचेवर उपयोगी सनस्क्रिन, मॉईश्चरायझर आणि क्रिम खरेदी करा. यामुळे त्वचा कोमल राहते.
पावसाळ्यात आरामदायी कपडे निवडा. जास्त घट्ट कपडे घालणे शक्यतो टाळा. पावसाळ्यात जीन्स घालणे टाळा. पावसाळ्यात डेनिमचे कपड्याऐवजी तुम्ही लाईक्रा, मलमल, पॉलिस्टरचे कपडे निवडा.
पावसाळा आला की सोबत सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू आणि पोटाचे विकार यांसारखे आजार होतात. अनेकदा रात्री-अपरात्री मुसळधार पावसामुळे मेडिकल दुकानात जाणे शक्य होत नाही. अशावेळी घरात आवश्यक औषधांचा किट ठेवा.