Dhanshri Shintre
पावसात भिजणं आनंददायक असलं तरी ते सर्दी, ताप आणि संसर्गासारख्या त्रासांचं कारण ठरू शकतं.
पावसाळ्यात विचार न करता भिजल्याने सर्दी, ताप, त्वचा संसर्ग आणि इतर आरोग्य समस्या होण्याचा धोका वाढतो.
पावसात भिजल्यामुळे शरीराचे तापमान अचानक कमी होते आणि त्यामुळे ताप, सर्दी, विषाणूजन्य संसर्गाची शक्यता वाढते.
पावसात भिजल्यावर त्वचेचा संसर्ग आणि बुरशी टाळण्यासाठी लगेच स्वच्छ कपडे घालणे आवश्यक आहे.
हर्बल टी, आले चहा आणि हळदीचे दूध शरीराला आतून गरम आणि तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.
पावसाचे पाणी घाणेरडे असू शकते, त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी पावसात भिजल्यावर आंघोळ करणे गरजेचे आहे.
थंड पाणी आणि जोरदार वारा शरीरातील कमकुवत भागांवर वेगाने विपरीत परिणाम करतात, त्यामुळे काळजी घ्यावी लागते.
तुळशी, आवळा, मध आणि ग्रीन टी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवून हवामान बदलांपासून संरक्षण करतात.
आजारी असाल तर पावसात भिजणे टाळा, मुले व वृद्धांना विशेष काळजी घेणे फार गरजेचे आहे.