Shruti Kadam
कर्तव्यदक्ष, राजकारण कुशल अशा महाराणी येसूबाई साहेब यांनी १६८० ते १७३० या कसोटीच्या काळात स्वराज्यासाठी अगदी महत्वाचे योगदान दिलेले आहे.
पिलोजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जिउबाई अथवा राजसबाई म्हणजेच महाराणी येसूबाई साहेब होय.
अंदाजे इसवी सन १६६१ ते १६६५ याच्या दरम्यान येसूबाई साहेबांचा विवाह हा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र धर्मवीर संभाजी महाराज यांच्या सोबत झाला.
वयाच्या ६ ते ७ वर्षात लग्न झाल्यामुळे त्यांच्या आयुष्याची जडणघडण ही मासाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली झाली.
छत्रपती शिवरायांच्या अनुपस्थिती मासाहेब जिजाऊ संपूर्ण राज्यकारभार सांभाळत असत त्याचप्रमाणे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी येसूबाई स्वराज्याची धुरा चपखलपणे सांभाळत असत.
इ.स. १६८९ मध्ये संभाजी महाराजांच्या निधनानंतर राजाराम महाराज व शंभूराजांचे पुत्र शाहू महाराज एकाच वेळी औरंगजेबाच्या हाती सापडू नये, म्हणून त्यांनी राजाराम महाराजांना रायगड सोडून जाण्यास सांगितले.
महाराणी येसूबाई स्वतः रायगड लढवत होत्या, पण रायगड लढवणे अशक्य झाल्याने त्यांनी स्वतःला आणि आपल्या मुलाला मुघलांच्या हवाली केले.
आयुष्याची २७ वर्षेहून अधिक काळ त्यांनी मुघलांच्या कैदेत घालवली. अखेर इ.स. १७१९ च्या सुमारास त्या दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या.
'छावा'मधील औरंगजेबाची भूमिका साकारणाऱ्या अक्षयला मिळालं सगळ्यात कमी मानधन! जाणून घ्या किती होती कलाकारांची फी