ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोज अंघोळ केल्यानंतर देवाला जल अर्पण केल्यास आयुष्यासाठी शुभ मानले जाते.
हिंदू धर्मात सूर्यदेवची पूजा केल्यास त्यांचा आर्शिवाद आपल्यावर कायम राहातो.
तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर या वस्तू पाण्यामध्ये टाकून देवाला अर्घ्य द्यावे. यामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही.
देवाला जल अर्पण करताना पाण्यामध्ये खडीसाखर घालणे शुभ मानले जाते.
सूर्यदेवाची पूजा करताना त्यामध्ये लाल, पिवळी फुले टाकणे शुभ मानले जाते.
जल अर्पण करणाऱ्या कलशामध्ये लाल चंदन मिसळावे. त्यामुळे देवांची कृपादृष्टी तुमच्यावर राहते.
देवाला जल अर्पण करताना त्यामध्ये अक्षता टाकाव्यात . त्यामुळे जीवनात सुख-शांती कायम राहते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.