Siddhi Hande
१४ फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. परंतु भारतासाठी हा काळा दिवस मानला जातो.
२०१९ पासून भारतात १४ फेब्रुवारीला ब्लॅक डे म्हणून संबोधले जाते. या दिवशी भारतावर हल्ला झाला होता.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा हल्ला झाला होता. यामध्ये ४० जवानांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती.
पुलवामाच्या आतंकवादी हल्ल्यात भारताने खूप काही गमावले आहे.
१४ फेब्रुवारी २०१९ रोजी सीआरएफ जवानांच्या गाड्या जम्मू काश्मीर हायवेवरुन जात होत्या तेव्हा दुपारी हा हल्ला झाला होता.
जवळपास २५०० जवानांना घेऊन जाणाऱ्या ७८ गाड्या या जम्मू काश्मीरच्या हायवेवरुन जात होत्या. तेव्हा दुपारी ३.१० मिनिटांनी पुलवामा येथील लेथपोरा येथे हा हल्ला झाला.
४० जवानांना घेऊन चाललेल्या एका बसला बॉम्बने उडवण्यात आले. पुलवामा येथे एक कार उभी होती. त्यात ३०० किलोपेक्षा जास्त आरडीएक्स होते.
कार आणि बसची धडक झाली आणि स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की अनेक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज गेला होता. या बसमधील एकही जवान परत आले नाही.
२०१९ मध्ये आजच्या दिवशी ४० जवान शहिद झाले होते. अनेकांची कुटुंब उद्धवस्त झाली होती.