Shreya Maskar
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरपासून २१-२४ किमी अंतरावर प्रतापगड किल्ला वसलेला आहे. प्रतापगड किल्ला इतिहासातील सर्वात महत्त्वाचे ठिकाण आहे.
प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये जावळीचे खोरे जिंकल्यानंतर मोरोपंत पिंगळे यांच्याद्वारे बांधून घेतला.
१६५९ मध्ये अफजल खानाशी झालेल्या लढाईचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला प्रतापगड किल्ला प्रसिद्ध आहे. प्रतापगड किल्ला आपल्या विहंगम दृश्यांसाठी आणि येथील भवानी देवीच्या मंदिरासाठी ओळखला जातो.
प्रतापगड किल्ल्यावरून सुंदर कोकण किनारा पाहायला मिळतो. या किल्ल्याच्या खालच्या भागातून निळसर समुद्र आणि सह्याद्रीच्या रांगांचे विहंगम दृश्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते.
प्रतापगड किल्ला प्रसिद्ध हिल स्टेशन महाबळेश्वर जवळी आहे. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटो क्लिक करू शकता.
प्रतापगड किल्ला हा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत (२०२४-२५) समाविष्ट असलेल्या १२ 'मराठा लष्करी भूदृश्य' किल्ल्यांपैकी एक आहे. प्रतापगड किल्ला १७ व्या शतकातील आहे.
प्रतापगड किल्ल्याच्या बुरूजांवरून दिसणारी दरीची विहंगम दृश्य पाहून तुम्ही भारावून जाल. प्रतापगड किल्ल्यावर १७ फूट उंच अश्वारूढ असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.