Shreya Maskar
गेलेकाही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. धो धो पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.
पाऊस पडल्यावर कायमच त्वरित वीज पुरवठा खंडीत केला जातो, या मागचे नेमकं कारण काय, आज जाणून घेऊयात.
जेव्हा पाणी ओव्हरहेड केबल्समधून जाते किंवा तडे गेलेल्या इन्सुलेटरमध्ये शिरते, तेव्हा पावसामुळे शॉर्ट सर्किट होतो, ज्यामुळे विजेचा फीडर बंद पडतो.
जोरदार वारे आणि मऊ झालेली जमीन यामुळे अनेकदा झाडांच्या फांद्या लाईटच्या तारांवर पडतात. या फांद्या जिवंत तारांना जमिनीशी जोडतात, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित न केल्यास आग लागण्याचा किंवा विजेचा धक्का लागण्याचा धोका असतो.
नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन वीजपुरवठा खंडित केला जातो. यामुळे पुराच्या पाण्यात पडलेल्या जिवंत तारांमुळे जनतेला होणारा जीवघेणा धोका टळतो.
वीज पडल्यामुळे विजेचा प्रचंड दाब वाढू शकतो, ज्यामुळे ट्रान्सफॉर्मर आणि व्होल्टेज रेग्युलेटर खराब होतात. यामुळे इलेक्ट्रिक उपकरणे देखील खराब होतात, तसेच त्यांच्यामुळे शॉक लागण्याचा धोका वाढतो. स्फोट देखील होऊ शकतो.
पावसाच्या दिवसांत सुरक्षिततेसाठी घरात चांगली चार्ज केलेली बॅटरी आणि सुगंधित मेणबत्ती ठेवाव्यात. तसेच लाईट गेल्यावर घरामध्ये विजेचा बॅकअप म्हणून इन्व्हर्टरचा वापर करणे सर्वात जास्त सोयीस्कर, सुरक्षित आणि लोकप्रिय आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.