Dhanshri Shintre
पावसाळा सुरू झाल्यावर निसर्गाची प्रत्येक बाजू खुलते आणि तो आपल्या सौंदर्याचं मनमोहक दर्शन घडवतो.
पावसाळ्यात भटकंतीची योजना करत असाल, तर ही ५ ठिकाणं निसर्गसौंदर्याने तुमचं मन नक्कीच जिंकून घेतील.
चेरापुंजी आणि मावसिनराम, मेघालयातील हे दोन ठिकाणं जगातील सर्वाधिक पावसासाठी ओळखले जातात.
केरळमधील अलेप्पीचे बॅकवॉटर, मुन्नारचे चहाचे मळे आणि कोझिकोडची निसर्गरम्यता पावसाळ्यात अधिकच मोहक भासते.
कूर्ग, दक्षिणेचे स्कॉटलंड म्हणून ओळखले जाणारे ठिकाण, पावसाळ्यात त्याच्या जंगल, धबधबे आणि कॉफीमुळे स्वर्गासारखे भासते.
महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव, लिंगमाला धबधबा आणि इतर ठिकाणं पावसाळ्यात अतिशय नयनरम्य आणि मनमोहक दिसतात.
मसूरी, नैनिताल आणि रानीखेतसारखी उत्तराखंडमधील हिल स्टेशन्स पावसाळ्यात ढगांच्या शुभ्र चादरीत लपलेली दिसतात, सुंदर दृश्य तयार करतात.