Mumbai treks: यंदाच्या विकेंडला ट्रेकिंगचा प्लान करताय? मुंबईजवळ असलेले हे 4 किल्ले ठरतील बेस्ट ऑप्शन

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा

पावसाळ्यात डोंगर, दऱ्या आणि किल्ले हिरव्यागार निसर्गाने बहरलेले दिसतात. धबधबे, ढग आणि थंड वातावरणामुळे ट्रेकिंगचा अनुभव अधिक छान वाटतो. त्यामुळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकिंगची आवड असलेले अनेक जण याच काळात ट्रेकची योजना आखतात.

Fort trekking | saam tv

ट्रेकिंग

ट्रेकिंग हा उत्तम व्यायाम असून त्यामुळे शरीराची सहनशक्ती आणि फिटनेस वाढतो. निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवल्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.

Easy treks near Mumbai | saam tv

ट्रेकला जाण्यापूर्वी तयारी

हवामानाचा अंदाज तपासूनच ट्रेकचं नियोजन करावं. घसरणार नाहीत असे ट्रेकिंग शूज, रेनकोट, पाणी आणि फर्स्ट एड किट सोबत ठेवावं. अतिवृष्टीचा इशारा असल्यास ट्रेक पुढे ढकलणं हा सुरक्षित पर्याय ठरतो.

Karnala Fort | saam tv

कर्नाळा किल्ला

कर्नाळा किल्ला मुंबईपासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर असून अतिशय सोपा ट्रेक मानला जातो. किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या परिसरात असल्याने ट्रेकदरम्यान विविध पक्ष्यांचं निरीक्षण करता येतं.

Songiri Fort | saam tv

इर्शाळगड

इर्शाळगडचा मुख्य ट्रेक मध्यम स्वरूपाचा असला तरी इर्शाळवाडीपर्यंतचा मार्ग सोपा आहे. पावसाळ्यात याठिकाणी मोरबे धरण आणि आजूबाजूच्या सह्याद्री पर्वतरांगा अतिशय सुंदर दिसतात.

Monsoon travel | saam tv

सोनगिरी किल्ला

पालघरमधील मनोरजवळ असलेला सोनगिरी किल्ला कमी उंचीचा आणि सोप्या चढाईसाठी ओळखला जातो. साधारण ३० ते ४५ मिनिटांत किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येत असल्यामुळे हा नवशिक्या ट्रेकर्ससाठी योग्य पर्याय आहे.

Weekend getaway | saam tv

कलावंतीण दुर्ग

कलावंतीण दुर्गाच्या शिखरापर्यंतचा अंतिम टप्पा कठीण असला तरी प्रभळमाचीपर्यंतचा ट्रेक नवख्या लोकांसाठी सोपा आहे. या मार्गावरून कलावंतीण दुर्ग आणि प्रभळगड यांचं अप्रतिम दृश्य पाहायला मिळतं.

Nature trails | saam tv

Mahabharata: महाभारतात शकुनीचा वध कोणी केला?

Mahabharata | saam tv
येते क्लिक करा