Ruchika Jadhav
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीच्या पिकाचे मोठे नुकसान होते. झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांवर अगदी जीवन संपवण्याची वेळ येते.
अशात शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई फार कमी असते, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी १ रुपये पिक विमा योजना आणली आहे.
नुकसानभरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांना ई पाहणी अॅप डाउनलोड करावे लागेल. त्यात न१ ऑगस्टपासून पीक पेरा नोंदणी सुरू होत आहे.
तुम्ही या विमाचा लाभ घेत असाल तर पीक पेरा अॅपवर फक्त एकदाच नोंदणी होते हे लक्षात ठेवा.
काही ठिकाणी पावसामुळे पुर आला आहे. तर अद्यापही काही ठिकाणी दुष्काळ आहे.
काही गावांमध्ये पेरणीनंतर आलेल्या पावसाने संपूर्ण शेती वाहून गेली आहे.
ज्या शेतीचे नुकसान नौसर्गिक आपत्तीमुळे झाले आहे, फक्त त्यांनाच या विमामार्फत नुकसानभरपाई मिळू शकते.