Shreya Maskar
जेव्हा मूल खायला नकार देतात, तेव्हा पालक जबरदस्तीने डाळ-भात खाऊ घालतात. मात्र हे चुकीचे आहे. यामुळे मुलं खातात पण ते मनापासून नसते, ज्यामुळे त्यांच्या शरीराला पोषण मिळत नाही. मुलांशी संयमाने वागा त्यांना वेळ द्या.
डाळ, भात, भाजी , चपाती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. त्यामुळे मुलांनी कितीही नाही म्हटले तर सुरुवातीला थोडं थोडं का होईन त्यांना हे पदार्थ प्रेमाने आणि हुशारीने खाऊ घाला. त्यांना यांच्यातील पोषणाचे महत्त्व पटवून द्या.
अनेक स्त्रिया आधी आपल्या मुलाला खाऊ घालतात आणि मग स्वतः जेवतात. पण तुम्हाला जर मुलाला डाळ- भाजी खाऊ घालायची असेल तर त्यांच्यासोबत जेवायला बसले पाहिजे. कारण मुलं पालकांचे अनुकरण करतात. पालकांना एखादी गोष्ट करताना पाहून शिकतात.
मुलांना छोट्या छोट्या खेळांच्या माध्यमातून जेवण खाऊ घाला. यामुळे मुलाला नवीन पदार्थ खाण्याची सवय लागते. जर तुमचे मूल अन्नाशी खेळत असेल, तर रागावू नका त्यांना तसे करू द्या.
जर तुमची मुलं काही ठराविक भाज्या खात नसतील तर त्यांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांमधून ते खाऊ घाला. उदा घरी बनवलेले सँडविच, पिझ्झा
जेवणाच्या वेळी मुलांना फोन, टिव्हीपासून दूर ठेवा. तुम्ही त्यांच्या बाजूला बसून त्यांना खाऊ घाला. त्यांच्याशी बोला, जेणेकरून ते त्यांत गुंतून राहतील आणि सर्व जेवण खातील.
मुलांना जेवणाची आवड लावण्यसाठी त्यांना जेवणाचे छोटे छोटे भाग खाऊ द्या. त्यात आकार, रंग यांचा समावेश करा. मुलांना पदार्थाचा वास घेऊ द्या. मुलांना ओरडे टाळा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.