Siddhi Hande
महाराष्ट्रातील लाखो वारकरी दरवर्षी पंढरपुरच्या वारीला जातात.
पंढरपुरला जाण्यासाठी दरवर्षी यात्रा निघते, त्यालाच वारी असं म्हणतात.
संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज आणि नामदेव महाराजांच्या अशा अनेक पालख्या त्यांच्या समृद्धी स्थळांवरुन पंढरपुरापर्यंत जातात.
वारीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वारकरी असे म्हणतात.
वाकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात पंढरपुरापर्यंत पायी चालत जातात.
वेगवेगळ्या वेशभूषा, टाळ, मृदृंग घेऊन अभंग गात ते पंढरपुरपर्यंत जातात.
वारकरी मोठ्या भक्तिभावाने आपल्या विठुरायाला भेटायला जातात. विशेष म्हणजे, त्यांच्या मनात काहीच आशा नसते. फक्त विठुरायाला भेटायची ओढ असते.
स्वच्छ, निर्मळ मनाने जाऊन वारकरी चंद्रभागेत जाऊन स्नान करतात. त्यानंतर आपल्या विठुरायाचे दर्शन घेतात.