Manasvi Choudhary
पाऊले चालती, पंढरीची वारी.. याप्रमाणेच आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरची वारी करतात. विठ्ठल नामाचा जयघोष करत शेकडो किलोमीटर पायी चालत जातात.
या वारीमध्ये महिला वारकरी डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन चालतात. तुम्ही देखील पंढरपूरच्या वारीमध्ये महिलांच्या डोक्यावर तुळशीचे वृंदावन पाहिलेच असेल.
पंढरपूरच्या वारीमध्ये डोक्यावर तुळस घेऊन चालणे ही केवळ परंपरा नाही तर धार्मिक, अध्यात्मिक महत्व आहे.
हिंदू धर्मात तुळशीला विशेष स्थान आहे. तुळस ही विठ्ठलांना प्रिय मानली जाते म्हणून विठ्ठलाच्या भक्तीसाठी पायी चालताना वारकरी डोक्यावर तुळस घेतात.
वारीमध्ये वारकरी डोक्यावर तुळस घेऊन चालतात म्हणजे देव आपल्यासोबत आहे असे मानले जाते.
तुळस ही पवित्र आणि सकारत्मकतेचे प्रतीक मानली जाते. वारीमध्ये भक्तीमय वातावरणात डोक्यावर तुळस घेऊन चालल्याने सकारात्मकता येते आणि मनाला प्रसन्न वाटते.why women carry Tulsi on head during Wari
वारीमध्ये डोक्यावर तुळस घेऊन चालण्याची ही परंपरा जुनी आहे. ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू असल्याने अनेक वारकरी घरातून आणलेली तुळस विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.