Shruti Vilas Kadam
पावसाळा सुरू झाला की निसर्गप्रेमींची पाऊले वळतात, डोंगररांगाकडे, धबधबे तसेच गडकिल्ल्यांकडे सुदैवाने मुंबई नजीकच्या पालघरमध्ये अशी ठिकाणे उपलब्ध आहेत.
जव्हार या ठिकाणी असलेला ३०० फूट उंचीवरून कोसळणारा महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि नयनरम्य धबधब्यांपैकी एक आहे, ट्रेकर्ससाठी हा आकर्षणाचा साहसी धबधबा असून पालघर रेल्वे स्थानकापासून फक्त ८० किमी अंतरावर आहे.
मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा दोन्ही स्वरूपाचा धबधबा आहे. धरणाचे पाणी जेव्हा ओव्हरफ्लो होते आणि कड्यावरून ३०० फूट खाली लेंडी नदीच्या पात्रात कोसळते आणि हा धबधबा तयार होतो. धबधब्यापर्यंत पोहोचण्याचा रस्ता साहसी जंगलातून जाणारा आहे, ज्यामुळे ट्रेकर्सना हा मार्ग खूप आवडतो.
पालघर समु्द्रकिनाऱ्यालगत असणारा ऐतिहासिक किल्ला पावसाळ्यात शांत सुंदर असतो. बुरूजावरून दिसणारा खवळेला समुद्र पाहण्यात पर्यटकांना आनंद मिळतो.
हा पालघरमधील सर्वात मोठा समुद्रकिनारा असून समुद्राच्या मोठ्या लाटा, किनाऱ्यावरील केळवे किल्ला, पाण्याचे तळे पाहण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करतात.
जव्हार या ठिकाणापासून सुमारे ८ किमी अंतरावर असलेला हा धबधबा १०० मी खोल आणि पायऱ्यांप्रमाणे कोसळणारा धबधबा आहे. हा धबधबा निसर्गाची अद्भुत कलाकृती आहे. रॉक क्लाइंबिक तसेच रॅपेलिंगसाठी हा धबधबा प्रसिद्ध आहे
पालघर स्थालकापासून जवळ असलेले एक शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. आजूबांजूना असलेले हिरवे डोंगर आणि हा तलाव फोटोशूटसाठी उत्तम ठिकाण आहे.
मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटात हा धबधबा असून पालघर रेल्वे स्थानकापासून अवघ्या ७ किमी अंतरावर आहे.
मुंबई - अहमदाबाद हायवेवर असणारा आशेरीगड हा ट्रेकर्ससाठी पावसाळ्यात पर्वणी आहे. गड सर करताना लागणारी धुक्याची चादर, आणि पाण्याचे छोटे मोठे झरे ट्रेकर्सचा उत्साह वाढवतात .