ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आपल्यापैकी अनेकजण जरा डोक दुखलं, सर्दी किंवा ताप आल्यावर लगेचच पेनकिलर घेतात.
पेनकिलर घेतल्याने दुखणे तात्काळ थांबते परंतु त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपण पेनकिलर औषध घेतो. परंतु जास्त प्रमाणात औषध घेणे शरीरासाठी हानिकार आहे.
पेनकिलर घेतल्याने पचनसंस्थेवर परिणाम होतो. जास्त प्रमाणात पेनकिलर घेतल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
पेनकिलरचा किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. पेनकिलरचे जास्त सेवन केल्याने किडनी निकामी होऊ शकते.
पेनकिलर सतत घेतल्याने अँटी रेझिस्टनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे काही काळानंतर कोणतेही औषध शरीरावर काम करणे बंद करते.
पेनकिलर घेताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या