Shreya Maskar
चाळीशीनंतर डोळ्यांची नजर तीष्ण ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे भरपूर असलेल्या पदार्थांचे सेवन करा, नियमित व्यायाम करा आणि UV किरणांपासून संरक्षण करणारे गॉगल वापरा.
संत्री आणि लिंबूवर्गीय फळांमध्ये भरपूर प्रमाणात 'व्हिटॅमिन सी' असते, जे डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांचे आरोग्य जपण्यास मदत करते. मोतीबिंदूचा धोका कमी करते.
ब्लूबेरीजमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे डोळ्यांच्या पडद्यातील (रेटिना) पेशींचे 'ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस'पासून संरक्षण करतात आणि रात्रीच्या वेळी स्पष्ट दृष्टी राखण्यास मदत करतात.
पपई हे 'बीटा-कॅरोटीन'चा उत्तम स्रोत आहे. तुमचे शरीर याचे रूपांतर सुरक्षितपणे सक्रिय 'व्हिटॅमिन ए'मध्ये करते. कमी प्रकाशातही दृष्टी तीक्ष्ण ठेवण्यास आणि डोळे कोरडे पडण्यापासून वाचवण्यास मदत करते.
कीवीमध्ये 'व्हिटॅमिन सी'सोबतच 'ल्यूटीन' आणि 'झियाक्सॅन्थिन' देखील भरपूर प्रमाणात असतात. हे हानिकारक निळा प्रकाश गाळून डोळ्यांतील नाजूक 'मॅक्युला'चे संरक्षण करते.
ॲव्होकॅडोमध्ये 'ल्यूटीन' आणि 'झियाक्सॅन्थिन'चे प्रमाण अधिक असते. हे डोळ्यांचे दीर्घकालीन पेशींचे नुकसान आणि वयोमानानुसार होणारी दृष्टीची हानी यांपासून संरक्षण करते.
ज्यूसऐवजी संपूर्ण फळे खा. पॅक फळांचे सेवन टाळा. दररोज किमान एक फळ तरी खा. ताजी आणि स्वच्छ फळांचे सेवन करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.