Food Safety: 'हे' पदार्थ कधीही वारंवार गरम करून खाऊ नका, अन्यथा होतील गंभीर परिणाम

Dhanshri Shintre

अन्न पुन्हा गरम करणे

अनेक लोकांना थंड झालेलं अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय लागलेली असते.

आरोग्यावर वाईट परिणाम

काही पदार्थ वारंवार गरम करून खाल्ले तर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो आणि तब्येत बिघडू शकते.

भात

भात वारंवार गरम करून खाल्ल्यास पोटदुखी, गॅस, उलटी आणि फूड पॉइजनिंगसारख्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते.

पालक

पालकात नायट्रेट असल्यामुळे ते वारंवार गरम करून खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, त्यामुळे टाळावे.

मशरूम

मशरूम वारंवार गरम करून खाल्ल्यास पचनाशी संबंधित त्रास जसे पोटदुखी, गॅस आणि अस्वस्थता जाणवू शकते.

चिकन

चिकन वारंवार गरम करून खाल्ल्यास पचनात अडथळे निर्माण होतात आणि पोट जड व भरलेले वाटू शकते, त्यामुळे टाळावे.

उकडलेली किंवा तळलेली अंडी

उकडलेली किंवा तळलेली अंडी पुन्हा गरम केल्यास त्यांचे पोषक तत्त्व कमी होतात, त्यामुळे ती वारंवार गरम करू नयेत.

बटाटा

बटाटा पुन्हा गरम करून खाल्ल्यास त्यातील गुणधर्म बदलतात आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, त्यामुळे टाळावे.

NEXT: अळशीचे सेवन केल्याने आरोग्यास काय फायदे होतात? जाणून घ्या

येथे क्लिक करा