Shreya Maskar
भारतात अनेक ऐतिहासिक ठिकाणे लपलेली आहेत. ज्यांची काहींना माहिती नसेल, त्यातील एक स्पॉट म्हणजे नरवर किल्ला होय.
नरवर किल्ला हे मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात वसलेला आहे. हा किल्ला १० व्या शतकात बांधला गेला. या किल्ल्याला मोठा इतिहास लाभलेला आहे.
विंध्य पर्वतरांगेत ५०० फूट उंचीवर वसलेला नरवर किल्ला, आपल्या विस्तीर्ण अवशेषांसाठी आणि 'राजा नल-दमयंती' यांच्या आख्यायिकेसाठी ओळखला जातो.
नरवर किल्ला कालिंदी नदीच्या काठावर आहे. तुम्ही येथे सुट्टीत फिरण्याचा प्लान करा. निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटो क्लिक करा.
कठीण चढणी आणि निसर्गरम्य मार्गासाठी, छीप महालसाठी, तसेच मध्ययुगीन काळातील एक महत्त्वाचा लष्करी बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.
नरवर किल्ल्यावर गेल्यावर राजपूत आणि मुघल शैलीचे स्थापत्य पाहायला मिळते. ज्यामध्ये भक्कम भिंती आणि जुन्या अवशेषांचा समावेश आहे.
नरवर किल्ल्याचे मूळ १० व्या शतकात कच्छपघात (कछवाहा) वंशाने वसवले असावे, असे मानले जाते. नंतर कछवाहा, प्रतिहार, तोमर आणि मुघलांनी यावर राज्य केले .
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.