Alisha Khedekar
नारळी पौर्णिमेला वेळ कमी असेल, तर खोबऱ्यापासून झटपट तयार होणारी करंजी किंवा बर्फी उत्तम पर्याय आहे.
खोबऱ्याची सारण भरून केलेल्या करंज्या सणाच्या ताटाला पारंपरिक आणि खास गोडवा देतात, शिवाय सर्वांना आवडतात.
गॅसवर झटपट खोबरे, साखर आणि दूध आटवून स्वादिष्ट बर्फी तयार करता येते, वेळही खूप कमी लागतो.
करंजीसाठी कणिक आणि सारण तयार करावे लागते; बर्फीसाठी मात्र मिश्रण तयार करून फक्त सेट करायचे असते.
गोड आणि मऊसर बर्फी मुलांना विशेष आवडते; त्यावर काजू-बदाम घातल्यास ती आणखी आकर्षक दिसते आणि चविष्ट लागते.
पाहुणे अचानक आले तर बर्फीचा पर्याय अधिक सोयीचा; कमी वेळेत तयार होऊन सर्व्ह करण्यासाठीही ती उत्तम ठरते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा