Shruti Vilas Kadam
नारळी भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य – बासमती तांदूळ (१ कप), किसलेलं ओलं खोबरं (१ कप), साखर (१ कप), तूप (२ टेबलस्पून), वेलदोडा पूड, थोडे काजू व बदाम, केशर दूध.
बासमती तांदूळ २०-३० मिनिटे स्वच्छ धुऊन पाण्यात भिजवून ठेवा. नंतर निथळून घ्या.
एका पातेल्यात पाणी उकळून त्यात तांदूळ घालून ८०% पर्यंत शिजवून घ्या आणि लगेच गाळून ठेवा.
दुसऱ्या भांड्यात तूप गरम करून त्यात किसलेलं ओलं खोबरं व साखर घालून मध्यम आचेवर थोडं शिजवून घ्या.
वेलदोड्याची पूड, केशर दूध व शिजवलेले तांदूळ खोबऱ्याच्या मिश्रणात हलक्या हाताने एकत्र करा.
एका छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात काजू-बदाम हलकेसे परतून भातात घालावे.
गॅस मंद आचेवर ठेऊन ५-७ मिनिटे झाकण ठेवून वाफ द्या. नारळी भात तयार झाला की त्यावर थोडंसं तूप घालून गरम गरम सर्व्ह करा.