Shreya Maskar
मुरुड-जंजिरा किल्ला हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील १७ व्या शतकातील एक सागरी दुर्ग आहे. तुम्ही येथे उन्हाळ्यात वन डे ट्रिप प्लान करू शकता.
मुरुड-जंजिरा हा भारतातील एकमेव 'अजिंक्य' किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत पर्यटकांसाठी खुला असतो.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात अरबी समुद्राच्या मध्यभागी वसलेला आहे. सिद्दी जोहरने १७ व्या शतकात या बेटावर अभेद्य तटबंदी बांधली.
मुरुड-जंजिरा किल्ल्यावरील तटबंदी अनेक प्रयत्न करूनही मराठे, पोर्तुगीज किंवा ब्रिटीश जिंकू शकले नाहीत. या किल्ल्याला इतिहासात मोठे महत्त्व आहे.
मुरुड-जंजिरा किल्ला हा प्रचंड तटबंदी, तीन बलाढ्य तोफांसाठी (कलालबंगडी, चावरी, लांडा कासम) आणि पूर्वेकडील एका गुप्त दरवाजासाठी ओळखला जातो.
चहुबाजूंनी खारे पाणी असतानाही, मुरुड-जंजिरा किल्ल्याच्या आत दोन नैसर्गिक गोड्या पाण्याचे तलाव आहेत.
मुरुड-जंजिरा किल्ल्याच्या भिंतींची उंची साधारणपणे ४० फूट (सुमारे १२ मीटर) आहे. अरबी समुद्रात वसलेला, १७ व्या शतकातील आणि २२ एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा द्वीप-किल्ला १९ भक्कम बुरुज, अभेद्य तटबंदीसाठी प्रसिद्ध आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.