Dhanshri Shintre
वरळी हे सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक स्थळांमुळे प्रसिद्ध असून पर्यटकांसाठी हे एक आकर्षक ठिकाण मानले जाते.
वरळी हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून आसपास अनेक लोकप्रिय ठिकाणे असल्यामुळे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते.
वरळी परिसरात आणि जवळपास अनेक खास ठिकाणे आहेत, जे पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावेत असे आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हे ठिकाण शांततेसाठी प्रसिद्ध आहे. येथे सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या जास्त असते. समुद्राच्या लाटा, शांत वारा आणि मुंबईचा आकर्षक देखावा पर्यटकांना खूप भावतो.
ब्रिटिश कालखंडात बांधलेला हा किल्ला इतिहासप्रेमींसाठी अत्यंत आकर्षक आहे. येथून समुद्राचा मनोहारी नजारा पाहायला मिळतो. किल्ल्याची रचना आणि परिसर आजही पर्यटकांना इतिहासाच्या आठवणीत घेऊन जातो.
वरळीपासून काही मिनिटांवर असलेली ही दरगाह समुद्राच्या मधोमध स्थित आहे. मुस्लिम श्रद्धाळूंसाठी हे एक पवित्र स्थान आहे आणि विविध धर्मातील लोक येथे भेट देतात.
विज्ञानावर आधारित हे केंद्र मुलांना आणि मोठ्यांनाही शैक्षणिक आणि रंजक अनुभव देतं. विविध विज्ञानप्रयोग, माहितीपूर्ण प्रदर्शनं आणि इंटरअॅक्टिव्ह गॅलरी पर्यटकांना आकर्षित करतात.
हा भव्य पूल वरळी आणि बांद्राला जोडतो. रात्रीच्या वेळी या पुलावरून दिसणारा मुंबईचा लाईट्सने झगमगणारा देखावा अतिशय सुंदर असतो.
खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी हे ठिकाण पर्वणीच आहे. येथे तारे, ग्रह आणि विश्वाबद्दल थ्री-डी शो आणि व्याख्यानं घेतली जातात.
मुलांसह फिरायला एक छान पर्याय. येथे प्राणी संग्रहालय (ZOO) आहे तसेच विविध प्रकारची झाडे आणि फुलांची बागही आहे.
अश्वस्पर्धा आणि खुल्या जागेचा अनुभव घ्यायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. वरळीपासून हे फार दूर नाही आणि खासगी कार्यक्रमांसाठीही याचा वापर होतो.