Shreya Maskar
पवई तलाव हा मुंबईच्या उत्तर उपनगरातील एक शांत आणि मानवनिर्मित आहे. पावसाळ्यात येथे हिरवेगार नंदनवन पाहायला मिळते.
पवई तलाव १८९१ मध्ये बांधण्यात आला. पवई, अंधेरी, जोगेश्वरीला राहणाऱ्या लोकांसाठी हे विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण आहे.
स्थानिक लोक येथे संध्याकाळी निवांत फेरफटका मारायला येता. सूर्यास्ताचा सुंदर नजारा येथे पाहायला मिळतो. तसेच विविध पक्षी पाहायला मिळतात आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो.
अंधेरी स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षाने किंवा बसने पवईला पोहचा. पवई तलाव फोटोशूटसाठी देखील खूपच प्रसिद्ध आहे.
पवई तलाव हा १९ व्या शतकातील एक कृत्रिम जलाशय आहे. धो धो पावसात तुम्ही येथे संध्याकाळी नक्की फेरफटका मारायला जा.
पवई तलावाच्या लगत 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे' (IIT) आणि 'आयआयएम (IIM) मुंबई' (पूर्वीचे NITIE) आहे.
पवई तलावाजवळ पवई गार्डन आणि हिरानंदानी गार्डनर आहे. येथे लहान मुलांना खेळायला खूप मजा येईल. मुलांसोबत वन डे ट्रिपसाठी हे मुंबईतील बेस्ट लोकेशन आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.