Manasvi Choudhary
वंदे भारत ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. वंदे भारत ट्रेनने प्रवास केल्याने अधिक सोपा आणि जलद होतो आहे.
देशात अनेक ठिकाणाहून वंदे भारत ट्रेन धावते. मुंबई - सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे मुंबईहून सोलापूर प्रवास करणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे.
मुंबई- सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे पूर्वीपेक्षा प्रवासांचा वेळ कमी झाला आहे. ४५५ किलोमीटरचे अंतर अवघ्या ६ तास ३० मिनिटांत पार होत आहे. त्यामुळे या वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मुंबई ते सोलापूर मार्गाने धावणारी वंदे भारत ट्रेन ही मुंबई सीएसएमटी स्टेशनमार्गे दादर, ठाणे आणि कल्याण या स्थानकांवर थांबते. नंतर ही ट्रेन पुणे स्थानकात थांबते. पुणेनंतर कुर्डुवाडी या स्थानकमार्गे थेट सोलापूर या स्थानकात पोहोचते.
या ट्रेनमुळे तुम्ही सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर या महत्वाच्या तीर्थस्थळांना भेट देऊ शकता.
मुंबई- सोलापूर वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवांशासाठी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे दोन पर्याय आहे. चेअर कार सीटसाठी १३०० रूपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार सीटसाठी प्रत्येकी २३६५ रूपये तिकीट आहे.