साम टिव्ही
अनेकांना पावसाळ्यात फिरायला आवडतं. पाऊस म्हटलं की अनेकांना डोंगर आणि घाटाची आठवण येते.
पावसाळा म्हटलं तर अनेक जण डोंगराळ भागात पाण्यात भिजायचा प्लान करतात.
पाण्यात भिजल्यास आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे फिरायला जाण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी बॅगेत ठेवणे गरजेचे आहे.
बॅगेत लवकर सुकणारे कपडे ठेवा. तसेच अतिरिक्त कपडे ठेवा.
पावसाळ्यात फिरायला जाताना बॅगेत छत्री ठेवा.
पावसाळ्यात डोंगराळ भागात फिरायचं म्हटलं तर गमबूट किंवा मान्सून शेूज घालणे फायदेशी ठरते.
फिरायला जाताना चप्पलची एक अतिरिक्त जोड सोबत ठेवा. तसेच चप्पल घालून जंगलात जाऊ नका.