Shruti Vilas Kadam
पावसाळ्यात ओलावा आणि दमटपणा वाढतो, जो माश्यांच्या वाढीसाठी आणि जगण्यासाठी अनुकूल असतो.
पावसाळ्यात सडणारे अन्नपदार्थ, कचरा , साचलेले पाणी यांवर माश्या जगतात, आणि जलद वाढतात. अन्नाच्या शोधात त्या घराकडे वळतात.
दमट हवामानामुळे माश्यांची प्रजनन क्षमता वाढते आणि ओला कचरा, साचलेला पाणी याठिकणी अंडी घालतात.
सर्वप्रथम अन्नपदार्थ झाकून ठेवा. घराच स्वच्छता ठेवा. कचऱ्याचा डब्बा वेळोवेळी धुवत जा. तरीही माश्या येत असतील तर काही सोप्पे घरगुती उपाय करून माश्या नष्ट करू शकता.
कापूर आणि तमालपत्र एका भांड्यात जाळा, याचा धुर आणि सुगंध घरमाश्यांसाठी असह्य होतो, आणि माश्या कमी होतात.
एका भांड्यात सफरचंद सायडर व्हिनेगर आणि डिश सोप मिसळा. माश्या त्याकडे आकर्षित होतील आणि त्यात मरून पडतील .
घरात लादी पुसताना पाण्यात मीठ आणि व्हिनेगर मिसळा. मीठाच्या अँटीबॅक्टेरिअल गुणधर्मांमुळे घरात माशा येण्याचे प्रमाण कमी होईल.
लिंबाच्या तुकड्यांंमध्ये १५ ते २० लवंग टोचा, आणि ते खिडक्यांवर, जेवणाच्या टेबलवर ठेवा, याच्या वासाने माश्या दूर राहतील .
१ ली. पाण्यात ४ ते ५ लिंबाचा रस पिळा, त्यात योग्य प्रमाणात मीठ मिसळा. हे पाणी सगळीकडे शिंपडा. यामुळे माश्यांचे प्रमाण कमी होईल.
Snakes During Monsoon : पावसाळ्यात दिवसात घरात साप शिरू नये, म्हणून करा हे सोप्पे ३ उपाय