Manasvi Choudhary
पावसाळा सुरू झाला की बाजारात रानभाज्या विकायला येतात. ग्रामीण भागात उंच डोंगरावर, टेकड्यावर उगणाऱ्या या भाज्या मार्केटमध्ये पाहायला मिळतात. या भाज्यांना गावरान भाज्या असे देखील ओळखले जाते.
गावरान भाज्या केवळ चवीलाच नाहीतर आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. पावसाळ्यातच या भाज्या मिळतात त्यामुळे या खाणे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. गावरान भाज्यांमध्ये औषधी गुणधर्म असतात.
पावसाळ्या मिळणाऱ्या या गावरान भाज्या कोणत्या आहेत? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
अळूची भाजी पावसाळ्यात घरोघरी आवर्जून खाल्ली जाते. अळूच्या पानांपासून ही भाजी बनते. अळूमध्ये लोह , कॅल्शियम, व्हिटॅमिन ए ही पोषकघटके असतात ज्यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. अळूची वडी, अळूचं फदफद या रेसिपी बनवल्या जातात.
पावसाळ्यात गवताळ भागात उगवणाऱ्या या भाजीला टाकळा असे म्हणतात. टाकळा भाजी चवदार लागते. टाकळा भाजीचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते.
भारंगी औषधी वनस्पती आहे. या भाजीचे सेवन केल्याने पावसाळ्यातील संसर्ग आजार दूर होतात. भारंगा या भाजीचे देठ आणि पानांची भाजी केली जाते.
घोळ भाजी डाळ घालून बनवली जाते. ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते.
करटोली ही पावसाळ्यात मिळणारी प्रसिद्ध गावरान भाजी आहे. या भाजीचे सेवन केल्याने शरीराला आरोग्यदायी फायदे होतात. रक्तातील साखर नियंत्रणात राहते म्हणून मधुमेह रूग्णांनी या भाजीचे सेवन करणे फायदेशीर आहे.