Manasvi Choudhary
पावसाळ्यात रानभाज्या खाल्ल्या जातात. या भाज्या औषधी असतात. आरोग्यासाठी देखील या भाज्या पौष्टिक मानल्या जातात.
पातूर भाजी ही पावसाळ्यात मिळणारी पौष्टिक रानभाजी आहे.
पातूर ही भाजी तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे.
भाजी बनवण्यासाठी पातूरची कवळी पाने भाजी,कांदा, लसूण, हिरवी व लाल मिरची तेल, मीठ हे साहित्य घ्या.
सर्वातआधी पातूर या भाजीची पाने आणि देठ निवडून स्वच्छ धुवून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये लसूण आणि बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्या. लसूण चांगला परतून घ्या.
नंतर या मिश्रणात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्या.
नंतर या मिश्रणात स्वच्छ धुवून घेतलेली पातूरची भाजी मिक्स करा. भाजी वाफेवर शिजवा.
भाजी व्यवस्थित शिजली की त्यात मीठ टाका.